
अलाहाबाद :
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या देशातील वातावरण तापले आहे. अशावेळी भाजपला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी विरोधक एकवटल्याचे चिन्ह असतानाच उत्तरप्रदेश राज्यात मात्र, अखिलेश-मायावती यांनी कॉंग्रेसला आघाडीतून बाजूला ठेवले आहे. त्यावर बोलताना आज राहुल गांधी यांनी या राज्यात कॉंग्रेस पूर्ण ताकदीने लढण्याची घोषणा केली.
प्रियांका गांधी यांच्या राजकीय प्रवेशानिमित्त आयोजित रॅलीनंतर पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव व बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांचा कॉंग्रेस पक्ष आफार करतो. मात्र, त्यांनी आघाडीच्या जागावाटपात आम्हाला सहभागी करून घेतले नाही. त्यामुळेच आम्ही उत्तरप्रदेश राज्यासह देशभरात ताकदीने लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.
Be the first to comment